शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

तीन वर्षांनंतरही पानसरेंचे खुनी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:58 IST

उत्तूर : समाजातील अंधश्रद्धा कमी करण्यासाठी झटणारे, शोषितांचे प्रश्न सोडवणारे डॉ. गोविंद पानसरे यांचा गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला. तीन वर्षे झाली तरी अद्याप मारेकरी सापडत नाहीत. अच्छे दिन म्हणणे व प्रत्यक्षात ते आणणे यात खूप फरक आहे. सरकार स्वत: काय देणार नसेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. आर-पारच्या लढाईस ...

उत्तूर : समाजातील अंधश्रद्धा कमी करण्यासाठी झटणारे, शोषितांचे प्रश्न सोडवणारे डॉ. गोविंद पानसरे यांचा गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला. तीन वर्षे झाली तरी अद्याप मारेकरी सापडत नाहीत. अच्छे दिन म्हणणे व प्रत्यक्षात ते आणणे यात खूप फरक आहे. सरकार स्वत: काय देणार नसेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. आर-पारच्या लढाईस सज्ज रहा, असे आवाहन महिला चळवळीच्या नेत्या डॉ. मेघा पानसरे यांनी केले.उत्तूर (ता. आजरा) येथे आजरा, भुदरगड तालुक्यातील देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी व शोषित महिला यांच्या निर्धार मेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर होते. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन डॉ. पानसरे यांच्या हस्ते झाले.पानसरे म्हणाल्या, आंदोलनाशिवाय सरकार जागे होत नाही. सरकारला सर्वसामान्य जनतेचे दु:ख, कष्ट दिसत नाही. या सरकारला मायबाप कसे म्हणणार. लहान-सहान गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत आहे. सरकार हे बड्या उद्योगपतींसाठी काम करते की काय, अशी शंका आहे. आम्हाला सन्मानाने जगण्यासाठी आमच्या मागण्या पूर्ण करा. कष्टकरी जनतेच्या पैशावर हे सरकार आहे. या सरकारला जागे करण्यासाठी आपण सर्वसामान्य जनतेसोबतच राहू.यावेळी देवदासी निराधार मुक्ती केंद्राचे उपाध्यक्ष चंद्रकांत तेलवेकर, सचिव बापूसाहेब म्हेत्री, नामदेव कांबळे, सरपंच वैशाली आपटे, देशभूषण देशमाने, आजऱ्याच्या नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, प्रा. राजा शिरगुप्पे, अनंतराव आजगावकर यांची भाषणे झाली. आप्पासाहेब कांबळे यांनी आभार मानले. प्रा. सुभाष कोरी यांनी सूत्रसंचालन केले.याप्रसंगी उपसरपंच सचिन उत्तूरकर, उपसभापती शिरीष देसाई, सदानंद व्हनबट्टे, महेश करंबळी, सुधीर जाधव, दीपक कांबळे, आप्पा कांबळे, सूरज कांबळे, मंगल कांबळे, रमेश नाईक, नामदेव कांबळे, नगरसेवक उदय कदम, बाबूराव धबाले, सूरज पुजारी, रवी कामत, महेंद्र कामत आदींसह देवदासी, तृतीयपंथी, वाघ्या-मुरळी, शोषित महिला मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध मागण्यांचा ठराव मेळाव्यात करण्यात येऊन धडक मोर्चास सहभागी होण्याचे ठरले.